Home Breaking News मुख्याध्यापक शिक्षण व्यवस्थेचा मुख्य कणा व सर्वेसर्वा असुन त्यांचा अभिमन्यू झालेला आहे...

मुख्याध्यापक शिक्षण व्यवस्थेचा मुख्य कणा व सर्वेसर्वा असुन त्यांचा अभिमन्यू झालेला आहे ; शिक्षक आमदार  विक्रम काळे .

नाशिक जिल्ह्यातील मुख्याध्यापकांचे एक दिवशीय उदबोधन शिबीर संपन्न . 

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी उदबोधन शिबीर रावसाहेब थोरात सभागृहात संपन्न झाले . शिबीरासाठी प्रमुख वक्ते व अतिथी शिक्षक आमदार विक्रम काळे मराठवाडा विभाग. मा . आमदार सुधिर तांबे, विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ .बी बी चव्हाण, शिक्षणाधिकारी – प्रविण पाटील, उपशिक्षणाधिकारी उदय देवरे व गणेश फुलसुंदर, मुख्याध्यापक महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष – केरूभाऊ ढोमसे ,पे युनिट अधिक्षक नितिन पाटील, शिक्षणकार्यालय अधिक्षक सुधिर पगार, लेखाधिकारी राजेश बुवा , व्याख्याते बी बी पाटील नितीन पाटील जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस के सावंत, सचिव श्री एस बी देशमुख, उपाध्यक्ष प्रदिप सांगळे डॉ . अनिल माळी , अशोक कदम, गोरख कुलधर, बी के नागरे, भागीनाथ घोटेकर, किशोर पालखेडकर, एस ए पाटील , योगेश पाटील, डी .एस ठाकरे, जाधव आर .टी, सुनिल फरस, दीपक गायकवाड , बी एन देवरे, सौ .पदमा पाठक, बी .डी गांगुडे व पदाधिकारी उपस्थित होते .

आमदार विक्रम काळे यांनी मुख्याध्यापकांची भुमिका अतिशय कठीण आहे . शिक्षक बालक चालक अधिकारी यांच्या मधला दुवा आहे यात त्यांचे कौशल्य पणाला लागते असे सांगितले . बी बी चव्हाण साहेब यांनी मुख्याध्यापकांचे कर्तव्याची , जबाबदरीची, अस्तित्वाची, अधिकाराची व आव्हानांची जाणीव करून दिली मुख्याध्यापकांसमोर असणाऱ्या विविध समस्या, अडचणी, विविध आव्हाने, उपाययोजना इ. बाबतीत मार्गदर्शन केले . याचबरोबर दिवसभरामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा , संचमान्यता, विद्यार्थी संख्या, पवित्र पोर्टल, टप्पा अनुदान, नविन पेन्शन योजना, प्रलंबीत बीले, लेखापरिक्षण, शाळेतील विविध कामे, गुणवत्ता इ .बाबत चर्चा करण्यात आली . कार्यक्रमाचे नियोजन एस बी देशमुख यांनी केले ,प्रास्ताविक श्री एस के सावंत , सुत्रसंचलन सौ . पदमा पाठक यांनी केले व आभार श्री प्रदिप सांगळे सर यांनी मानले जिल्ह्यांतून १ooo पेक्षा जास्त मुख्याध्यापक हजर होते असे उद्बोधन शिबीर दोन दिवसांचे व्हावे अशी मागणी अनेक मुख्याध्यापकांनी केली

Previous articleनासिक येथे भाग्योदय राष्ट्रीय राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये कवी मनोहर पवार यांचे काव्य वाचन .
Next articleसकल ओबीसी समाज संघटनेतर्फे गुरूवारी हिमायतनगर येथे रस्ता रोको.