हिमायतनगर प्रतिनिधी :- अंगद सुरोशे
किनवट तालुक्यातील इस्लापूर परिसरातील मूळझरा येथील एका शाळकरी मुलांने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या. ओमकार माधव वानोळे हा शासकीय आश्रम शाळा कुपटी येथे इयत्ता दहावी मध्ये शिकत होता.
काही दिवसापूर्वीचपंचमीच्या सणाच्या निमित्ताने गावाकडे आला व बरेच दिवस गावाकडे होता. त्यामुळे त्याचे दहावीचे वर्ष असल्यामुळे शासकीय आश्रम शाळा कुपटी येथील शिक्षकाने ओंकार शाळेत का येत नाही यासाठी त्याच्या पालकाला विचारपूस केली व त्याचं दहावीचं वर्ष आहे त्यामुळे त्याला शाळेमध्ये लवकर पाठवा असे सांगितले.
त्यानंतर ओमकार च्या वडिलांनी रागाच्या भरात त्याला शिवीगाळ केली. याच गोष्टीचा मनात राग धरून गावालगत असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे मूळझरा गावांमध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. असे मूळझरा येथील गावकऱ्यांनी सांगितले. तरी सदरील घटनेची नोंद इस्लापूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. त्यानंतर या घटनेचा इस्लापूर पोलीस स्टेशन मार्फत पुढील तपास चालू आहे.