अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी
तालुक्यातील शेतकरी यांच्या आत्य आवश्यक कामाचे प्रशासनाचे कृषी कार्यालय सतत चिखलमय राहत असल्याने तालुक्यातील शेतकरी हे कामानिमित्त कृषी कार्यालयात चिखलातून पायपीट करावी लागत असल्याने शेतकरी यांना याचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे मात्र या चिखलाकडे येथील कृषी अधिकारी जाणीव पुर्वक लक्ष देत नसल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे तेवढे नव्हे तर तालुक्यातील आतिवृष्ठी च्या परिस्थितीत कर्मचारी कार्यालयात हजर नसल्याचे शेतकरी सांगत आहेत त्यांना या बाबत विचारणा केली असता आम्ही साईड वर आहोत अशी उडवा उडवीत उत्तरे देतात या सर्व बाबीकडे तालुक्याचे लोकप्रतिनीधी यांनी तात्काळ लक्ष देउन मुजोर हलगर्जी करणार्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कडक कार्यवाही करावी .