भूमीराजा
संग्रामपूर : वंचित बहुजन युवा आघाडी संग्रामपूर तालुका अध्यक्ष आशिष धुंदळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार,दि २ मे रोजी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
गेल्या १५ दिवसा पासून संग्रामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला,असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असुन,जीवना आणि मरणाच्या उबरठ्यावर उभा आहे.
त्यामुळे या शेतकऱ्यांविरोधी सरकारला जाग यावी आणि नुकसान पाहणी करून तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी ५०००० हजार मदत द्यावी.अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी संग्रामपूर तालुक्याच्या वतीने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या ८ दिवसांत मदत जमा न झाल्यास युवा आघाडी या शिंदे फडणवीस सरकार विरोधात महामोर्चा काढल्याचे आश्वासन निवेदनातुन देण्यात आले.
यावेळी आशिष धुंदळे ता अध्यक्ष, राहुल भिलंगे ता उपाध्यक्ष, निलेश लहासे, भावराव वानखडे , ओकार अमझरे , कालुभाई शेख श्रीकृष्ण खंडेराव , सुनिल धुंदळे, शतृकुन बाजोडे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थीत होते.