अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात आवकाळी पावसाचे संकटं भोकर , हदगाव, तामसा, हिमायतनगर, आर्धापुर लोहा, कंधार, किनवट, निवघा, बाळापुर,नांदेड, आश्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट, तसेच पावसाने अक्षरश झोडपून काढल्याने येथील शेतकरी मात्र चिंतेत सापडला आहे भोकर भागातील केळी, टरबुज, खरबुज, पपई, या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे या आवकाळी पावसाचे नांदेड जिल्हा येथील सर्व शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आसुन प्रशासनाच्या वतीने लवकर पंचनामे करुन शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच पिकविमा, अतिवृष्टी गारपीट मुळे झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाततुन होत आहे