प्रतिनिधी :-योगेश घायवट
हिंगोली- पावसाने शेतकऱ्याचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अन अशा विदारक परिस्थितीत पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण योग्य पध्दतीने होणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही, त्यामुळे कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे चांगले संतापलेले आहेत त्यामुळे त्यांनी थेट पीक विमा कंपनीच्या कार्यालयात धाव घेऊन नुकसान्याची चौकशी केली असता त्यांना कर्मचाऱ्याकडून उडवाळूची उत्तरे मिळाली त्यामुळे संतप्तक बागल यांनी कार्यातील साहित्याची तोडफोड केली. तर शेतकऱ्याच्या सहनशीलतेचा अंत बघू नका एक शेतकरी पीक विम्या पासून न ठेवण्याचा इशारा आमदार संतोष बांगर यांनी कंपनीला दिला आहे. शेतकरी हा चांगलाच उध्वस्त होत चालला आहे हातातून शाळेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय अशा परिस्थितीमध्ये पी किंवा कंपनीने शेती पिकाचे संरक्षण योग्य पद्धतीने करणे नितांत गरजेचे होते एवढेच नव्हे तर याच पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खोट्या साक्षर या केल्याचेही कृषी विभागाच्या तपासणीमध्ये उघडकीस आले आहे प्रत्येक पाहता हिंगोली जिल्ह्यात 3. 88 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा भरला असून विमा हप्त्यापोटी 24 कोटी रुपयांचा भरणा केला आहे नंतर केंद्र राज्य शासनाने 144 कोटी 98 लाख रूपयाची रक्कम विमा कंपनीला दिल्याचे आ. बांगर यांनी सांगितले. तर हिंगोली जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी झाली असून, नुकसानीची माहिती शेतकऱ्यांने मुदतीमध्येच आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल कंपनीला दिली होती, परंतु कंपनीच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्याने शेतात जाऊन सर्वेक्षण न करता शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचे ओंढा आणि कळमनुरी तालुका कृषी अधिकाऱ्याच्या तपासणीत उघड झाले. त्यामुळे शेतकऱ्याच्या सहनशीलतेचा अजिबात अंत पाहू नका असा स्पष्ट इशारा आमदार संतोष बांगर यांनी किंवा कंपनीला दिलेला आहे शेतकरी हे काहीही करू शकतील त्यांना पिक विमा मंजूर करून त्यांच्या पदरात पीकव्यापोटी जी रक्कम मिळेल ते टाकून द्या असे आ. बांगर यांनी अधिकार कर्मचाऱ्यांना ठणकावून सांगितले. या सर्व प्रकारची मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार असल्याचे ही बांगर म्हणाले.