Home Breaking News बोरगडी येथे कृषि विभागाच्या वतीने शेतीशाळा संपन्न*

बोरगडी येथे कृषि विभागाच्या वतीने शेतीशाळा संपन्न*

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 25 सप्टेंबर 2022

तालुक्य‍ातील मौजे बोरगडी येथे राज्य पुरस्कृत, एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना कापुस पिकाची शेतीशाळा कृषी विभागाकडून घेण्यात आली. सदर शेतीशाळेत शेतकरी कापुस पिकावरील येणा-या गुलाबी बोंड अळी व्यवस्थापणासाठी व बोंड अळीची आर्थीक नुकसान पातळी तपासण्यासाठी, कामगऺध सापळ्याचा वापर कसा करावा. या बाबत मार्गदर्शन करून सापळ्याचे वाटप करण्यात आले. व पक्षी थाऺबे,पिवळे चिकट सापळे या बाबत माहीती देण्यात आली. तसेच बोंड अळीच्या व कापसावरील रस शोषन करणारे किडीची माहीती देऊन, व्यवस्थापणा बाबत माहीती देण्यात आली. शेतक-यानी कापुस पिकाची निरीक्षणे घेऊन चित्रीकरण व सादरीकरण केले. साऺघीक खेळ घेउन शेतीशाळेची साऺगता करण्यात आली. सदर शेतीशाळेत प्रशिक्षण प्रवर्तक तथा कृषी साहायक कोटूलवार , कृषी सहाय्यक माझळकर , कृषी सहाय्यक नंदनवार तसेच सुर्यवंशी साहेब आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक घुमलवाड, कृषिमित्र कल्याण वानखेडे उपस्थित होते. यांनी पिक व्यवस्थापन व नियोजन या विषयावर अतिशय चांगले शेतकऱ्यांना शेतीशाळे द्वारे आज माहिती देण्यात आली.

*शेतीशाळेचे फायदे खाली प्रमाणे दिसून आले आहे.
*शेतिशाळे चे फायदे-*
1. शेतिशाळेत सहभाग घेणारे शेतकरी यांचे मध्ये स्वत:चा आत्मविश्वास निर्माण होतो. स्वत:ला निर्माण झालेल्या अडचणी,शंका तो मांडू शकतो व चर्चा कर शकतो. एकात्मिक पिक व्यवस्थापन करताना कोणती पद्धती योग्य की अयोग्य या बाबतीत तो संभ्रमावास्थेत न राहता आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतो.शेतकरी बोलका झाला..
2. शेतिशाळेत स्वत: प्रात्यक्षिक स्वरुपात प्रत्येक गोष्ट केल्यामुळे योग्य काय किंवा अयोग्य काय या बाबतीत आपल्या शेतीतील निर्णय घेण्यास शेतकरी निर्णयक्षम बनतात. उदा. बियाणे,मशागत पद्धती, कोणत्या घ्याव्यात याबाबत निर्णय ते स्वत: घेऊ शकतात.
3. शेतकरी शत्रु किड व मित्र कीटक ओळखू शकतात. सर्वसाधारणपणे शेतकरी हा शेतात कोणत्याही प्रकारचा कीटक दिसला की, तो पिकाचा शत्रु समजून फवारणी घेणे. हा पर्याय निवडतो. परंतू शेतिशाळेचे प्रशिक्षण घेतलेला शेतकरी हा आपल्या शेतात असणारे शत्रु किडी व मित्र किटक ओळखू शकतो. त्यामुळे तो त्या शेतातील व्यवस्थापनाचे निर्णय स्वत: घेऊ शकतो.
4. शेतिशाळेचे शेतकरी हे पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे या बाबतीत दक्ष राहतात. पर्यायाने उत्पादन खर्च कमी होवुन शेतकरी यांचा फायदा कशा होईल हे सर्व शेतकऱ्यांना कळले आहे
5. छोट्या छोट्या गटात काम केल्याने सहकार्याची भावना वृद्धींगत होते.या मुळे त्यांना पिका बदल माहिती मिळाली
6.पिक निहाय तंत्रज्ञान आणि त्या संबंधीत कौशल्ये शेतकरी यांचे पर्यंत प्रभावी पणे पोचतात आले आहे

Previous articleनवरात्र उत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे लावणाऱ्यांवर होणार कारवाई — उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील
Next articleवनबंधु परिषद एकल विघालय किनवट येथे खेळ स्पर्धा संपन्न.