हर घर तिरंगा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावे- सहशिक्षक पेंढारकर
भूमीराजा न्यूज
प्रतिनिधी/ कृष्णा राठोड
९१४५०४३३८१
हिमायतनगर:-तालुक्यातील
श्रीक्षेत्र बोरगडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थी, पालक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य, यांनी
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हरघर तिरंगा उपक्रमांतर्गत 9 ऑगस्ट रोजी मंगळवार सकाळी ८वा.क्रांती दिनाचे औचित्य साधून भारतीय लोकांच्या मनात राष्ट्रभावना,प्रेम,जागृत करण्यासाठी व हर घर तिरंगा उपक्रम गावातील प्रत्येकाने स्वतःच्या घरावर तिरंगा फडकवण्यासाठी लोकांच्या मनात राष्ट्र भावना निर्माण व्हावी,हा उपक्रम गावातील प्रत्येकाने राबवावा , हर घर तिरंगा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जनतेने मोठ्या उत्साहात साजरा करावे
म्हणुन वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार जि.प.प्रा.शा.बोरगडीने आज
गावातुन प्रभात फेरी काढून, विद्यार्थ्यां मार्फत नाऱ्याच्या जयघोषात, हातात तिरंगा, घेवुन गावातील फेरी नंतर मारुती मंदिर परिसरात सर्व गावकऱ्यांच्या उपस्थित जनमानवी साखळींचे आयोजन करण्यात आले त्यासाठी गावातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी, असंख्य नागरिक, महिला सर्व शिक्षक व अंगणवाडीताई सरपंच ,उपसरपंच, मंदिर कमेटी अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, लोकतंत्र चे पत्रकार माधवजी काईतवाड उपस्थित होते.