👉 शेतक-यांचा आर्त टाहो….
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक -16 जुलै 2022
पैनगंगा नदी काठच्या शेतकऱ्यांना यंदाचा खरीप हंगाम काळे दिवस घेऊन आला आहे. नदिच्या पाण्यांने शेतकऱ्यांचे पिकचं नाही तर जमिनीवरील जो वरचा तिस इंचाचा सुपीक थर असतो. तोच वाहुन गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडुन एकच शब्द निघाले…… ” माय, बाप सरकार पिक नाही हो आमचं काळीजचं नेलं नदिनं…. अशा आक्रोश करीत बळीराजाचे यावर्षीचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने ताबडतोब आर्थीक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.