कार्ला पि येथील अल्पभुधारक शेतकर्याचे कापूस विकलेले होते पैसे,आले होते
हिमायतनगर तालुक्यातील घटना
अंगद सुरोशे
हिमायतनगर प्रतिनिधी/ बॅंकेतुन शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड करीता फोन ऐत असल्याचा निनावी कॉल ऐत आहे या मध्ये टेस्ट मॅसेज करून त्यामध्ये एक लिंक ऐत आहे.लिंकवर क्लिक करून आलेला ओटीपी सांगताच खात्यातील रक्कम गायब होत असल्याचे प्रकार घडत असुन असाच एक प्रकार सोमवारी एका शेतकऱ्यासोब घडला असुन खात्यातील 85 हजार रुपये काढून घेतले असल्याने सदरील शेतकरी हतबल झाला असुन ऐवढी रक्कम गायब केली असल्याने खळबळ उडाली आहे शेतकऱ्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात भेट देऊन नांदेड च्या सायबर क्राईम कडे तक्रार केली आहे.
हिमायतनगर तालुक्यात निनावी कॉल करून अनेकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार आहे.कारला येथील अल्पभूधारक शेतकरी नाथा बळीराम चौरे यांना बॅंकेतुन बोलतो असा निनावी नंबरवरून सोमवारी सकाळी फोन आला.या दरम्यान तुमचं क्रेडिट कार्ड बंद कराव लागेल अन्यथा दंड लागतो असे बोलत तुमच्या मोबाईलवर टेस्ट मॅसेज बँकेतून पाठवला आहे त्या लिंकच बटन दाबा आणि ओटीपी सांगा सदरील ओटीपी सांगताच शेतकरी नाथा चौरे यांच्या भारतीय स्टेट बँकेच्या खात्यात कापूस विकून जमा असलेले 85 हजार रुपये काही सेकंदात गायब झाले असल्यामुळे त्या व्यक्तीला धक्काच बसला आहे . निनावी फोन करून अनेकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार घडत आहे.याबबतीत सायबर क्राईम कडे जाऊन तक्रार करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.यापुर्वी दोन महिन्या पुर्वी पिचोंडी गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावरील 75 हजार रुपये रोख निनावी फोन करून काढून घेतली आहे.अशा अनेक घटना घडत असुन शेतकऱ्यांसह प्रत्येक नागरीकांनी जागरूक राहणे गरजेचे असुन बँकेतून फोन आला असला तरी बँकेत भेट द्यावी परंतु कुणालाही ओटीपी सांगू नये असे आवाहन बँकेच्या शाखा अधिकारी तसेच पोलिस निरीक्षक यांनी केले आ