Home Breaking News अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान.

अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक -01 सप्टेंबर 2024

हिमायतनगर तालुक्यात शनिवारी रात्री प्रचंड अतिवृष्टीने कहरच केला आहे. विजेच्या कडकडाट सह प्रचंड पाऊस पडल्याने नदी, नाल्यांला महापुर आला आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन, हळद, मका, ज्वारी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अजुनही जोरदार पावसाच्या सरीला सुरूवात झाली आहे. या अतिवृष्टीने शेतक-याचे कंबरडे मोडले आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकरी बांधवांना आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी होत आहे.

Previous articleराष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग आज दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर
Next articleकार्यालयीन सहाय्यक प्रशासन अधिकारी एस. बी. बोरा सेवानिवृत्त.