Home Breaking News * शांतीदुत हा मानवतेचा…!!

* शांतीदुत हा मानवतेचा…!!

सत्तेसाठी “वाट्टेल ते करुन” सत्ता संपादन करणारे प्रस्थापित समाजात दुहीचे बीजं पेरणी करुन, “फोडा आणि राज्य करा” या नितीचा अवलंब करतात, त्याचाच भाग म्हणून जेव्हा जेव्हा देशात निवडणुका येतात तेव्हा तेव्हा जातिय किंवा धार्मिक दंगली घडतात हा काही योगायोग नाही.जातीय किंवा धार्मिक दंगली हे रचलेलं षडयंत्र असते….!!

इतिहास साक्षी आहे की, आपल्या देशात धार्मिक दंगली घडवून, समाजातील अल्पसंख्याक समुहाला भीतीच्या सावटाखाली ठेवायचे आणि त्यांची मतं ओरबाडून सत्ता मिळवायची हा प्रस्थापितांचा पॅटर्न झाला आहे….!!

सत्ताधा-यांचा सत्तेसाठी हा खेळ होतो त्यातुन त्यांना सत्ता मिळते मात्र दंगलीत होरपळलेल्या समाज मनाचा कुणी विचार केला आहे का.? पशुपरी माणसांच्या कत्तली होतात आणि मानवता संकोचते त्याचे काय..??

दंगलीत काही जीव जातात, शेकडो महिलांची अब्रू लूटल्या जाते, शेकडो जखमी होतात, हजारो बेघर होतात, लाखो लोकांना त्याची झळ पोहचते आणि करोडों जीव भीतीच्या सावटाखाली जगतात एकंदरीतच समाज हवालदिल होतो, मानवता आचके देते.म्हणून हा जीवघेणा खेळ थांबला पाहिजे यासाठी काळाची हाक म्हणून मानवतावादी नेतृत्व पुढे येतं आणि समाजाच्या सुख, समाधानासाठी पुढाकार घेतं हाही आपल्या देशाचा इतिहास आहे…!!

वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या ४० वर्षाच्या सार्वजनिक जीवनात अनेकदा शांतीदुताची भुमिका घेऊन समाजहिताचं, मानवतावादी कार्य केलं आहे…!!

१९७६-७८ साली औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न उपस्थित झाला आणि मराठवाड्यात जातिय दंगली मोठ्या प्रमाणावर घडवण्यात आल्या त्यावेळी दोन्ही बाजूंनी आगलावे भाषणं करुन समाजमनं चेतवण्याचं काम सुरू होतं अशावेळी १९८० साली अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्याचा दौरा करुन नामांतरवादी कृती समिती निर्माण करुन, भांडणे मिटविणे, नुकसानभरपाई मिळवून देणे आणि समाजात समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले त्यावेळी शांतीदुताची भुमिका घेतली.उध्वस्त झालेल्या समाज मनावर फुंकर मारण्याचं काम केलं…!!

१९८७-८८साली महाराष्ट्रात पुन्हा रिड्लस या बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथावरून दंगली घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला गेला, चिथावणीखोर भाषणं देऊन दलीतांची घरे पेटवा अशी भाषा वापरली त्यावेळी मुंबई मध्ये भव्य मोर्चा काढून अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी विरोधकांना चला बंद पडलेल्या गिरणी कामगारांच्या चुली पेटवू अशी शांतीदुताची भुमिका घेऊन हाक दिली त्याचा परिणाम असा झाला की, दंगली पेटवण्यासाठी सरसावलेले हात शांत झाले आणि नामांतराच्या दंगलीत जशी मनुष्य आणि आर्थिक हानी झाली तशी रिड्लस च्या प्रकरणात रक्ताचा एकही थेंब न सांडता रिड्लस प्रकाशित झाले. अनेकांचे प्राण वाचले जीव आणि वित्त हानी टळली…!!

२०१६ मध्ये महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी “एक मराठा लाख मराठा” अशी हाक देऊन ५३ मोर्चे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात काढण्यात आले त्यावेळी भाजपच्या फडणवीस सरकार वर दबाव वाढतं होता अशा पार्श्वभूमीवर षडयंत्रकारी राजकीय पुढा-यांनी काही दलित नेत्यांना हाताशी धरून प्रति मोर्चे काढण्यासाठी ऊचकवले होते आणि मराठा विरुद्ध आंबेडकरवादी अशा दंगली पेटवायचा मनसुबा होता त्यावेळी अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी दलित नेत्यांना ठणकावून सांगितले प्रति मोर्चे नको त्यांनी शांतीदुताची भुमिका घेतली आणि महाराष्ट्रात होणाऱ्या दंगली थांबवल्या. विध्वंस टळला…!!

१ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या निष्पाप दलित आणि ओबीसी लहान मुले, असहाय्य महिला आणि नागरिकांवर समाज कंटकांनी दगडफेक केली,हल्ला केला, गाड्या फोडल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक देऊन संपूर्ण महाराष्ट्रात पेटणा-या दंगली शमविल्या,भयभीत झालेल्या समाजात चेतना जागविली होणारा विध्वंस टळला…!!

२०२४ च्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम धार्मिक दंगली घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले आहेत, त्याचाच भाग म्हणून कोल्हापूर मध्ये दंगल घडवली आणि मुस्लिम तरुणांना नाक घासायला भाग पाडले…!!

महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम धार्मिक दंगली साठी औरंगजेब यांच्या नावाचा वापर करायचे ठरविले आहे. म्हणून औरंगजेबाचे स्टेट्स ठेवले म्हणून दंगल, औरंगजेबाचा फोटो लावला म्हणून दंगल असा पॅटर्न सुरू झाला आहे.मुस्लिम समुहाला भयग्रस्त करायचे आहे.अशावेळी सेक्युलर कॉंग्रेसचे नेते मात्र गप्प आहेत, पुरोगामी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुद्धा गप्प आहेत…!!

सत्तेसाठी मतांच्या धृवीकरणासाठी मुसलमानांना भयभीत करुन भाजपला हिंदू मते हवी आहेत मात्र त्याचवेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुस्लिम मते ही भीतीच्या सावटाखाली मिळणार म्हणून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा गप्प आहे…!!

घराणेशाही ला कंटाळलेला मुस्लिम मतदार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला मते देणार नाही मग त्यांना हिंदुत्ववादी पक्षांची भीती निर्माण होऊ द्या म्हणजे तो आपसुकच एकजुटीने आपल्याला मते देईल म्हणून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तोंडात मिठाची गुळणी धरली आहे…!!
महाराष्ट्रात दंगली घडवून सत्ता मिळवायची स्वप्न पाहणारे षडयंत्रकारी राजकीय पक्ष एका बाजूला सत्तेचा विचार करीत आहेत मात्र मानवतावादी शांतीदुत प्रकाश आंबेडकर होणारा विध्वंस टळला पाहिजे म्हणून, कुणीही भीतीच्या सावटाखाली येऊ नये म्हणून, महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम धार्मिक दंगली घडू नये म्हणून प्रस्थापितांच्या षडयंत्राची हवाच काढून घेतात, औरंगजेबाच्या कबरी ला भेट देऊन भयभीत होणाऱ्या समुहाला हिम्मत देतात, आणि प्रश्न उपस्थित करतात, औरंगजेब इथल्या मातीतला नाही का.??
इतिहासाचा दाखला देऊन जयचंदांची औलाद कोण हेही विचारतात…???
मित्रांनो जो नेता पद आणि प्रतिष्ठे पेक्षा मानवतेला अधिक महत्व देतो आणि मानवतावादी दृष्टिकोनातून शांतीदुताची भुमिका घेतो त्या नेत्यांसाठी राजकारण हे अंतिम ध्येय नसते तर ते एक साधन असते…!!

वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा आणि आंबेडकरवादी समुहातील दंगल थांबवण्यासाठी शांतीदुताची भुमिका घेतली त्यांना मराठा मते मिळवायची नव्हती तेव्हा निवडणुक नव्हती, आज हिंदू-मुस्लिम दंगल थांबवण्यासाठी शांतीदुताची भुमिका घेतली आहे, त्यामागे मानवतावादी दृष्टिकोन आहे, मतांचे राजकारण नाही म्हणून मी यापुर्वीची त्यांची शांतीदुताची भुमिका विषद केली आहे…!!

काळाच्या कसोटीवर दुष्टचक्रात संकुचित होणारं मनुष्यत्व जपणारं नेतृत्व म्हणून अॅड बाळासाहेब आंबेडकर आपली शांतीदुताची भुमिका वठवितं आहेत हे समस्त जणांना कळावे म्हणून हा खटाटोप…!!
जयभिम
@.. भास्कर भोजने.

Previous articleकारची समोरासमोर धडक, तीन गंभीर जखमी; पिंजर ते बार्शिटाकळी रस्त्यावरील घटना
Next articleपावसाची वाट पाहत…शेतकरी पाहतोय निरभ्र आकाशाकडे