Home Breaking News नाशिक गोदा घाट रामकुंड पंचवटी अहिल्या जन्मोत्सव सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा..

नाशिक गोदा घाट रामकुंड पंचवटी अहिल्या जन्मोत्सव सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा..

हेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर -8983319070

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित सोहळा मोठ्या थाटामाटात साधुसंत महंत होळकरशाहीचे वंशज राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व जाती धर्मातील जनतेच्या सहभागातून भव्य दिव्य स्वरूपात हा सोहळा साजरा झाला यामध्ये पाच दिवसीय सप्ताह ठेवून 28 मे ते एक जून पर्यंत हा 16 पार पडला यामध्ये 31 मे रोजी सायंकाळी रामकुंडा या ठिकाणी गोदा आरती व अहिल्या आरती मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात साजरी झाली तसेच त्या सोहळ्यासाठी होळकर शाही चे मामाचे वंशज अमरजीत दादा बारगळ , महंत भक्तीचरणदास महाराज,सतीश शुक्ला गुरुजी ,योगेश महाराज गवारे, तसेच List राज्यमंत्री शोभाताई बच्छाव दिगंबर भाऊ मोगरे, नवनाथ ढगे दत्तू भाऊ बोडके विनायक जी काळदते, या सोहळ्यासाठी उपस्थित होते. हा भव्य दिव्य सोहळा गंगातीराव तीरावर मोठ्या बहुसंख्य जनतेच्या साक्षीने पार पडला. यामध्ये यामध्ये 298 जन्मानिमित्त 298 वैवाहिक जोड्या चा हातून ही आरती करण्यात आली. यामध्ये एक जून रोजी सायंकाळी सात वाजता यशवंत पटांगण या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच साधू संतांच्या आशीर्वादाने होळकर शाहीचे वंशज. तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते इंदूर राजघराणे चे राजे यशवंत महाराज होळकर यांनी पॅरिस वरून नासिक मध्ये संवाद साधून सर्व नाशिककरांना पहिला जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या यामध्ये तळोदा संस्थानचे जहागीरदार अमरजीत दादा बारगळ, दिगंबर आखाड्याचे महंत भक्तीचरणदास महाराज, होकरशाहीचे वंशज मुकुंद राजे होळकर, लक्ष्मण नजन सर, भाऊसाहेब राजोळे, योगेश जी धरम शैलेश धारे,प्रहार उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू भाऊ बोडके, ओंकार शाळेचे इतिहासकार रामभाऊ लांडे,महावितरण चे डेप्युटी इंजिनियर विनोद ढोरे साहेब, काळदाते साहेब,नवनाथ जी ढगे,भास्कर जाधव, विनायक काळदाते अहिल्यादेवी सिनेमा निर्माते सोनवणे व सर्व कलाकार या ठिकाणी उपस्थित होते तसेच या सोहळ्याची समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधान जी बागल यांनी प्रास्ताविक केले व समितीचे ध्येयधोरणे मांडले काही गोष्टींचे मागणी करण्यात आली यामध्ये नासिक येथील गोदा घाट ठिकाणी अहिल्यादेवींनी घाट मध्ये काशी विश्वेश्वर मंदिर बांधले या ठिकाणी अश्रुरुड पुतळा व्हावा. तसेच प्रशासकीय इमारतीमध्ये अहिल्यादेवी होळकरांचा एक स्मारक असावे, तसेच हिंदुस्तानची महिला शासक हिंदू धर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त सोहळ्याची माहिती दिली. यामध्ये प्रमुख सुप्रसिद्ध महाराष्ट्रातील व्याख्याते लक्ष्मण नजन सर, यांची व्याख्यान अहिल्या जन्मोत्सव निमित्त जोरदार भाषण शैलीमध्ये झाले. त्याचप्रमाणे त्यांनी अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सवानिमित्त मल्हार होळकर व अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर अतिशय सुंदर शब्दात व्याख्यान दिले,अहिल्यादेवी होळकर यांनी या भारत देशाचा शेकडो वर्षाचा सांस्कृतिक वारसा जतन करून ठेवण्याचे महान कार्य केले आहे. त्यांनी अडीचशे वर्षांपूर्वी केलेले लोक कल्याणकारी कार्य आजही अनेक ठिकाणी असलेल्या तलावाच्या, बारवच्या,मंदिरांच्या, रूपाने जिवंत आहे. त्यांच्या असामान्य नेतृत्व गुणाला पैलू पाडण्याचे काम त्यांचे पितृतुल्य सासरे मल्हारराव होळकर यांनी केले होते. सासरे मल्हारराव होळकर हे आठराव्या शतकातील उच्च राजनैतिक गुण असलेले, अंधश्रद्धा न पाळणारे, स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. असे अनेक परदेशी इतिहासकारांनी मत नोंदवले आहे .याच असामान्य व्यक्तिमत्व सासरे मल्हारराव होळकरांचे संस्कार अहिल्यादेवी होळकर यांना मिळाले होते. असे व्याख्याते लक्ष्मण नजन सर सर्व नाशिककरांना आपला भाषा शैलीमध्ये मंत्रमुग्ध केले. यामध्ये महाराष्ट्र शासनाने मांडलेल्या अहिल्यादेवी पुरस्कार च्या धरतीवर एका महिलेचा पहिला रत्न पुरस्कार देऊन स्वागत करण्यात आले यामध्ये अलका सुखदेव सपनार यांना देण्यात आला त्यामध्ये एकाच घरातील चार अपंग भावंडे व घरदार सांभाळून त्या महिलेचा कौतुक करावे तितकी कमी त्यांना आईला रत्न पुरस्कार म्हणून संबोधित करण्यात आले. यामध्ये अनेक मान्यवरांचे काठी घोंगडी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या सोहळ्याची सूत्रसंचालन सुहास सुरळीकर सर यांनी त्यांच्या सुंदर अशा शब्दांमध्ये हा संपूर्ण सोहळा पार पाडला यामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष ऋषिकेश धापसे यांची मनोगत झाले एकपात्री नाटक स्वाती गजबार यांनी अतिशय सुंदर शब्दांमध्ये मांडले . भक्ती चरणदास स्वामी यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये अहिल्यादेवी होळकरांचे जीवन चरित्रावर आयोध्या च्या हिंदुस्तानच्या अहिल्यादेवी होळकर यांच्या कामावरती प्रकाश टाकला. तसेच सोहळ्याचे अध्यक्ष तळोदा संस्थांचे जागीरदार अमरजीत दादा बारगळ यांनी अहमदनगरचे नाव अहिल्या नगर अशी घोषणा झाल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले व हा सोहळा इतका भव्यदिव्य स्वरूपात साजरा केला त्याबद्दल समितीचे अभिनंदन केले तसेच या सोहळ्यासाठी लवकरात लवकर या मागणीचा विचार करून राजे यशवंतरावजी होळकर यांच्या पर्यंत हा संदेश दिला जाईल अशी आश्वासन अमरजीत दादा बारगळ यांनी केले तसेच हा सोहळा पार पाडण्यासाठी समितीचे अध्यक्ष स्वागत अध्यक्ष कार्याध्यक्ष या सर्व टीमने मेहनत घेतली यामध्ये अमोल गजभार सर प्रशांत बागल, अण्णासाहेब सपनार, श्याम गोसावी वैभव रोकडे विजय काळदाते पांडुरंग शिंदे भूषण जाधव,ऋषिकेश शिंदे देवराम रोकडे राजाभाऊ बदड संदीप क्षीरसागर चंद्रभान रहाटळ जगन काकडे हेमंत शिंदे डॉक्टर कापडणीस सत्यम बागल पप्पू हुलगडे विशाल बागल व मार्गदर्शक स्वरूपात असलेल्या सर्व ज्येष्ठांनी यामध्ये हा सोहळा पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. तसेच या सोहळ्याचे आभार प्रदर्शन विनायक काळदाते यांनी केले.

Previous articleहळद उत्पादक शेतकऱ्यांची व्यापा-याकडुन लुट!
Next articleपिंगलवाड सरांचे कार्य असेही कौतुकास्पद  वाचा