Home Breaking News स्वर्गरथाचा पाटा तुटल्याने भिषण अपघात. 👉 ५ जन गंभीर ७ जन किरकोळ...

स्वर्गरथाचा पाटा तुटल्याने भिषण अपघात. 👉 ५ जन गंभीर ७ जन किरकोळ जखमी

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 23/ नोव्हेंबर 2022

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील परसराम कांबळे यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार 22 नोव्हेंबर रोजी दुपारी पार पडले. अंत्यविधीसाठी आलेल्या मंडळींना वाहन मिळाले नसल्याने, त्याच स्वर्गरथात बसुन हिमायतनगर येथे जात असतांना अचानक स्वर्गरथाचा पाटा तुटल्याने भिषण अपघात झाला. या अपघातात ५ ज गंभीर जखमी तर ७ जन किरकोळ जखमी झाले. ५ जन गंभीर प्रवाशी पाहुण्यांना नांदेड येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. किरकोळ जखमींना हिमायतनगर येथे रुग्णालयात हलविण्यात आले. या जखमींमध्ये सुनंदा दिलीप कांबळे, मिराबाई पांडुरंग तुळसे, पुण्यरथा साखरे, सगुणा तुळसे, संगिताबाई तुळसे हे गंभीर जखमी असुन, त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दिलीप कांबळे, गंगाराम कांबळे, सुदाम वाठोरे, पांडुरंग वाठोरे,वछलाबाई शांताराम तुळसे, प्रयागबाई तुळसे, आदि किरकोळ जखमीवर हिमायतनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय अधिकारी भुरके यांनी जखमी रुग्णांची तपासणी केली आहे. जखमी रुग्णांना बिटजमादार अशोकराव सिंगनवाड साहेब,
भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, मुन्ना शिंदे, बालाजी ढोणे, काॅग्रेसचे योगेश चिलकावार, यांनी रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली आहे. सदरील प्रवाशांना काही वाहन मिळाले नसल्याने, ते गाडीमध्ये बसून येत होते. अचानक गाडीचा पाटा तुटल्याने स्वर्गरथाचे चालक रामेश्वर पिटलेवाड यांनी प्रतिनिधींना सांगितले.

Previous articleहिंदी प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नाशिक क्रातिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांची जयंती उत्सहात साजरी
Next article