लोकनेते बाबुराव कदम कोहळीकरानी दिले उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन…!
भूमीराजा न्यूज,हिमायतनगर शहर प्रतिनिधी
कृष्णा राठोड- ९१४५०४३३८१
हदगांव / हिमायतनगर /-
हदगाव हिमायतनगर तालुक्यातील अनेक राशन दुकानदारांना मागील मे महिन्यापासून चे धान्य विशेषत गहू, तांदूळ,मिळाले नाही, तसेच त्यांच्या इ-पॅज मशीन सुरळीत चालू नसल्यामुळे इ-पॉज मशीनी मध्ये धान्य टाकले जात नसल्याने राशन दुकानदार जनतेला धान्याचा पुरवठा सुरळीत करू शकत नाहीत.
सध्या सण उत्सव चालू असल्याने या काळात नागरिकांना लोकांना राशन मिळत नाही तर लोकांना सण उत्सव साजरे करणे अवघड जात आहे., यामुळे राशन दुकानदारांना तात्काळ धान्य देऊन व त्यांच्या इतर तांत्रिक अडचणी दूर करून जनतेला धान्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी आज लोकनेते बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी उपविभागीय कार्यालय हदगाव येथे निवेदनाद्वारे विनंती केली आहे.